Sunday, April 02, 2006

हिंदुंना सामन्यतः आपल्या सहिष्णुतेचा अतिशय अभिमान असलेला दिसून येतो. पण याचा थोडा विचार केला तर यात एक वेगळाच प्रकार दिसून येतो.मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मीय लोक त्यांच्या स्वधर्मातील लोकांशी अतिशय सौहार्दाने वागतांना दिसतात.पण इतर धर्मीयांबाबत त्यांचा दृष्टीकोण तितकसा सहिष्णू दिसत नाही.ते इतर धर्मियांना आपल्या धर्मात वळवण्यासठी भरपूर प्रयत्न करतांना दिसतात.याउलट हिंदू इतर धर्मांशी भरपूर सहिष्णुतेने वागतात.ते जेवढ्या श्रद्धेने गणपतीसमोर डोकं टेकवतात तेवढ्याच श्रद्धेने एखाद्या मशिदीत किंवा चर्चमध्येही प्रार्थना करतात.पण स्वधर्मियांसोबत हिंदूंचं वर्तन कसं असतं?धर्मातील उच्चवर्णीय लोक इतर धर्मीयांसोबत भलेही संबंध ठेवतील पण आपल्याच धर्मबांधवांबद्दल त्यांना तितकिशी आपुलकी नसते. महारांनी तर त्यांना नरकसमान वाटणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्माचा सन्मार्ग स्विकारला तरी सवर्ण हिंदूंच्या मनातील त्यंच्या बद्दलचा अकस अजून पुर्ण दूर झाल नाही. अजुनही अभिजनांच्या सभेत बाबासाहेबांचं नाव जरी घेतलं तर कपाळावर आठ्या पडतात,हे कशाचं द्योतक आहे? असहिष्णू असलेल्या इतर धर्मियांना भलेही अश्या पागलाची उपमा देता येईल जे दुसऱ्यांना दगडं मारतात पण हिंदुंचं काय? ते तर अश्या पागलप्रमाणे आहेत जो वेडाच्या भरत आपल्याच हात,पाय आदि अवयवांना चावत आहे. या चर्चेद्वारे मला कुठल्याही धर्माला दोष द्यायचा नाहीये,पण हिंदुंनी त्यांच्या धर्माबद्दल थोडं आत्मचिंतन करावं इतकच हेतू आहे. तो सफ़ल व्हावा इतकीच अपेक्षा!
शिवश्री

1 Comments:

Blogger manu said...

var-var baghata hindu dharm bhalehi sahishnu vatala tari dharmgranthanna barkaine baghitalyas ya sahishnu hindu dharmachi khari assalata samor yete. hindu dharmacha abhiman balaganaryanni nidan ekada tari pramanikpane va tatasthtene hindu granthancha barkaine abhyas karava! satya aapoaap samor yeil! very good ganeshrao keep it up!

11:20 PM  

Post a Comment

<< Home